रविवार, २५ मार्च, २००७

अशांतता

आज काहीतरी लिहावे असे वाटत होते. काय लिहावे ? माहीत नाही. खूप काहीतरी विचित्र वाटतंय. मन भरून आलंय. कशाने ते कळत नाही. खूप काम समोर दिसतयं. पण हातून काहीच होत नाही.

मन कशानेतरी अशांत आहे. कसली तरी हूरहूर लागून रहिली आहे. काहीतरी घडणार आहे हे मला कळतयं. काहीतरी विचित्र. माझी तयारी आहे का ? कळत नाही. करायला हवी हे ही कळतयं. पण नेमके काय ते कसं कळावं ? काहीतरी गडबड आहे. जेव्हा एकटा असतो तेव्हा विचारांनी डोकं पार उठतं. विचार, विचार, विचार. मन सैरभैर होतं.

सर्व दैनंदिन व्यवहार व्यवस्थित सुरु आहेत. सर्व कामे नीटपणे करत आहे. पण कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. इतरांना कदाचित माझी मनोवस्था कळणार नाही. मला मात्र आत काहीतरी तुटल्यासारखं एकदम जाणवतं. आणि जगाशी असलेला संपर्क क्षणभर तुटून मी स्वतःलाच हरवून बसतो.

कदाचित मला लवकरच या सर्वाचं कारण समजेल. मी वाट पहातोयं. ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: